रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! भुसावळमार्गे धावणाऱ्या या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

भुसावळ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे रेल्वे प्रशासनाने भुसावळ मार्गे धावणाऱ्या बलिया, गोरखपूर, मडगाव, नाशिक – बडनेरा या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

या गाड्यांची मुदतवाढ

मुदतवाढ केलेल्या गाड्यांमध्ये ०१०२५ दादर ते बालिया गाडीची मदत २९ मार्चपर्यंत होती. ती आता ३० जून २०२४ पर्यंत धावेल. ०१०२६ बालिया ते दादर विशेष गाडीची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. ती आता ३ जुलैपर्यंत चालेल. ०१०२७ दादर ते गोरखपूर विशेष गाडी ३१ मार्चऐवजी ३० जूनपर्यंत धावेल. ०१०२८ गोरखपूर ते दादर गाडी २ एप्रिलऐवजी आता २ जुलैपर्यंत चालवली जाईल. ०११३९ नागपूर ते बडनेरा द्वि साप्ताहिक गाडी ३० मार्चऐवजी आता ८ जून २०२४ पर्यंत धावेल. ०११४० मडगाव ते नागपूर द्वि साप्ताहिक गाडी ३१ मार्चऐवजी ९ जूनपर्यंत सेवा देईल. ०१२११ बडनेरा ते नासिक ही गाडी दररोज ३१ मार्चपर्यंत धावणार होती. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे ती आता ३० जूनपर्यंत चालवली जाईल. ०१२१२ नासिक ते बडनेरा ही गाडी ३१ मार्चऐवजी ३० जूनपर्यंत धावेल. या सर्व गाड्यांची वेळ, थांबा यात कोणताही बदल झालेला नाही. मेमू गाडी वगळता इतर प्रवासी गाड्यांचे आरक्षणदेखील सुरू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.