रौद्र रुप; समुद्रात ३ ते ५ मीटर उंचीच्या लाटा!

मुंबई : अरबी समुद्रावर घोंगावणार्‍या बिपरजॉय या चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं असून, आता चे मुंबई- महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकताना दिसत आहे. असं असलं तरीही राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे स्पष्ट परिणाम दिसत असून, समुद्रही खवळल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला अरबी समुद्राला उधाण आल्यामुळं मुंबई किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे.

मालवण ते वसई किनारपट्टी भागात १३ जूनपर्यंत तब्बल ३.५ ते ५.१ मीटर उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. इशार्‍याच्या धर्तीवर सध्याच्या घडीला नागरिकांना किनार्‍यांच्या नजीक न जाण्याचा इशारा देण्यात आला आले. तर, एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.

यंदाच्या वर्षी मान्सूनच्या दिवसांमध्ये समुद्र एकदोन नव्हे, तर तब्बल ५२ दिवस खवळणार आहे. दरम्यानच्या काळात मुंबईह राज्याच्या विविध किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार पावसासोबतच दर्याचं रौद्र रुप धडकी भरवणार आहे. जून महिन्यातील १३ दिवस, जुलै महिन्यातील १४ दिवस, ऑगस्टचे १४ दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील ११ दिवसांना समुद्र रौद्र रुप धारण करेल. प्रशासनाकडून यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रकच जाहीर केलं आहे.

या दिवशी सावधानतेचा इशारा

जून महिन्यात समुद्रात ४ ते ८ जून दरम्यान हायटाईडचा इशारा देण्यात आला होता. ज्यानंतर आता १३ जूनलाही मोठ्या लाटा उसळणार असल्याचं सांगण्यता आलं आहे.
पुढे ३ ते ८ जुलै या तारखांदरम्यान समुद्र खवळलेला असेल. शिवाय यादरम्यान पावसाचा जोरही वाढलेला असेल.
ऑगस्ट महिन्यात १ ते ६ ऑगस्ट आणि ३०-३१ ऑगस्ट या अखेरच्या दोन दिवशी समुद्राचं रौद्र रुप पाहायला मिळू शकतं.
सप्टेंबर महिन्यातही असेच काही दिवस समुद्र खवळलेला असेल. ३, २८, २९, ३० या तारखांना किनारपट्टी भागांना उंच लाटांचा तडाखा बसेल.
३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शहराच्या समुद्र किनार्‍यावर साधारण ४.६० मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळतील असा इशारा देण्यात आला आहे.