लग्नाचे आमिष! महिलेला पुण्याला घेऊन गेला अन् पुढं जे घडलं…

जळगाव : राज्यासह जिल्हयात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी बेलदारवाडी येथील राहणारा दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार (वय-३०) या तरुणाने महिलेला लग्नाची आमिष दाखविले.

तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पहूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.