वादळामुळे घर कोसळून चौघांचा मृत्यू; ८ वर्षीय मुलाचे खा. रक्षा खडसेंनी केले सांत्वन

जळगाव : आंबापाणी (ता. यावल) येथील थोरपाणी आदिवासी पाड्यावर वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी घडली होती. तर ८ वर्षाचा मुलगा बचावला होता. खासदार रक्षा खडसे यांनी बुधवार, २९ रोजी त्याची भेट घेत सांत्वन करून धीर दिला. तसेच संबंधित कुटुंबाला व नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून योग्यती भरीव मदत तत्काळ मिळावी यासाठी सोबत उपस्थित अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना केल्या.

यावल तालुक्यातील सातपुडापर्वत रांगेस लागून असलेल्या आंबापाणी गावाजवळ थोरपाणी, आदिवासींची वस्ती आहे. २६ मे रोजी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामध्ये घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर ८ वर्षाचा मुलगा बचावला होता.

दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी बुधवार, २९ रोजी त्याची भेट घेत सांत्वन करून धीर दिला. तसेच संबंधित कुटुंबाला व नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून योग्यती भरीव मदत तत्काळ मिळावी यासाठी सोबत उपस्थित अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना केल्या.

यांचा मृत्यू
या घटनेत पावरा कुटुंबातील नानसिंग गुला पावरा, सोनुबाई नानसिंग पावरा, रतीलाल नानसिंग पावरा व बालीबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.