विवाहित महिलेने स्वतःला पेटवून घेतले, 2 मुलांनाही… गावात शोककळा

जमीन विकण्यावरून पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीने आपल्या दोन मुलांसह स्वतःला पेटवून घेतले. या आगीत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

नितीन एका खासगी कंपनीत काम करतो. त्यांची पत्नी मंजू ब्युटी पार्लर चालवायची. नितीनने जमीन विकल्यावर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात मंजूने तिच्या दोन मुलांसह स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि स्वत:ला पेटवून घेतले. खोलीला आग लागल्याने मंजू आणि तिची दोन मुले गंभीररीत्या भाजली.

घराला आग लागल्याने गावात एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. लोकांनी मंजू आणि तिच्या मुलांना खोलीतून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

मंजू आणि तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. आग लावण्याच्या घटनेने गावात खळबळ उडाली. एकाच वेळी तीन मृत्यू झाल्याने लोक दु:खी झाले आहेत. त्याचवेळी गावातील लोक मंजूच्या या आत्महत्येचे पाऊल चुकीचे असल्याचा आरोप करत आहेत. कौटुंबिक वाद असेल तर असे पाऊल उचलायला नको होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेचा तपास करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे  ही घटना घडलीय.