शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस जबरदस्त टोला, म्हणाले…

मुंबई : देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये तोडफोड करुन सत्ता मिळवली गेली आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे तो भाजपा विरोधी आहे. त्यामुळे असाच ट्रेंड कायम राहिला तर २०२४ मध्ये देशाचं चित्र बदलेलं दिसेल असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. यास उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर देत जबरदस्त टोला लगावला आहे.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी
ट्रेंड बदलण्याची स्वप्नं पवारसाहेब वर्षानुवर्षे पाहात आहेत. २०१४, २०१९ लाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही स्वप्न पाहिलं. विधानसभेतही पाहिली. पण ती काही पूर्ण झाली नाहीत. तसंच मी तुम्हाला सांगतो हे जे डायलॉग तुम्ही पवारसाहेबांचे सांगत आहात असेच २०१४ मध्ये होते, २०१९ मध्ये होते. निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलॉग काय असतील याची आम्हाला सवय झाली आहे. देशभरात मोदी विरोधी वातावरण आहे म्हणत आहेत कुठे आहे मोदीविरोधी वातावरण? ३०० पेक्षा जास्त लोक निवडणून आले तरीही मोदीविरोधी वातावरण दिसतं आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे बोलत आहेत.

निलेश राणेंचं खोचक ट्वीट

देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं शरद पवार एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं. आता त्यासंदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी खोचक ट्वीट केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करून त्यावर निलेश राणेंनी शरद पवारांना लक्ष्य करणारं ट्वीट केलं आहे. निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, असं या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणाले आहेत.