शिक्षकांच्या बदल्या गावकऱ्यांना अमान्य; नदीत उतरून सुरु केलं जलसमाधी आंदोलन

परभणी : शिक्षकाची बदली होत असल्याने विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाल्याचे आपण सोशल मीडियावर वाचले असलेच. अशीच एक बातमी परभणी जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या शिक्षकांमुळे ‘आदर्श शाळा’ असं नाव रूपात आलं त्या शिक्षकांची बदली झाली आहे. ती बदली अमान्य करत गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे.

सूत्रानुसार, जिल्ह्यातील इरळद गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेतील सहा शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यानंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या झालेल्या बदल्या तात्काळ रद्द करण्यात याव्या, अशी मागणी करत गावकऱ्यांनी नदीत उतरून जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे.

गावकऱ्यांना शिक्षकांच्या बदल्या अमान्य आहे. बदली करण्यात आलेल्या शिक्षकांनी गावातील शाळा आदर्श केली असून, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारल्याचा दावा गावकऱ्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या बदल्या तात्काळ रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.