संजय राऊत ठाकरेंना विसरले, काय घडलं?

मुंबई : राहुल गांधी हे देशातील निर्विवाद नेता आहेत. त्यांचं नेतृत्व आम्हा सर्वांना मान्य आहे. त्यांना देशभरातील लोकांचं समर्थन आहे. असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यावरुन त्यांना ठाकरेंचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईत होऊ घातलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हे विधान केलं आहे. इंडिया आघाडीला हरवणं कठीणचं नव्हे, अशक्य आहे , असंही राऊत म्हणालेत.
https://youtu.be/xAAeVC7KuGY
“2024 च्या निवडणुकीत इंडिया आघाडी जिंकणार आहे. लोकांचं आम्हाला समर्थन आहे. इंडियाला हरवणं मुश्कीलच नव्हे तर नामुम्किन आहे. येत्या काळात आमचंच सरकार सत्तेत येणार आहे. आज संध्याकाळी इंडियाची बैठक सुरु होईल. उद्यापर्यंत ही बैठक चालेल. या बैठकीतून आम्ही देशासमोर मोठा अॅक्शन प्लॅन घेऊन येऊ. राहुल गांधी हे देशातील निर्विवाद नेता आहेत. त्यांचं नेतृत्व आम्हा सर्वांना मान्य आहे. त्यांना देशभरातील लोकांचं समर्थन आहे. त्यामुळे इंडियाला हरवणं आता शक्य नाही. कुणाच्याही बापाला ते जमणार नाही.” असं संजय राऊत म्हणालेत.
“भाजप- शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर बैठक घेऊ द्या नाही तर चांद्रयान खाली बोलावून त्यात बसून चंद्रावर जात बैठक घेऊ द्या. तरीही काहीही होणार नाही. आता आमच्या आघाडीचा पराभव करणं कुणालाही शक्य नाही. इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक होतेय. या बैठकीला देशभरातील नेते दाखल झालेत. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक होतेय. आजच्या या बैठकीकडे देशाचं लक्ष आहे.” असं राऊत म्हणालेत.