“संजय राऊत हा शकुनी मामा, सूर्याजी पिसाळ” राऊतांवर कुणाचा प्रहार?

मुंबई : संजय राऊत हा शकुनी मामा, सूर्याजी पिसाळ आहे. बाळासाहेब तुझेही विठ्ठल होते ना मग त्यांचं घर का फोडले? असा सवाल करीत संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भांडण लावून दिली. आता आदित्य आणि तेजस यांच्यात भांडणे का लावताय? असा सवाल उपस्थित केला आहे. आग काड्या लावण्याचे काम स्वत:हून बंद करुन मग इतरांना संजय राऊत यांनी सल्ला द्यावा, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
राऊतांना प्रत्त्युत्तर करताना राणे म्हणाले, “२०१९ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न हाच संजय राजाराम राऊत बघत होता. आणि पवार साहेब हे माझंच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला आणि याच्या लायकीप्रमाणे दोन ते तीन पेक्षा जास्त आमदार त्याच्या बैठकांना जमलेच नाही. म्हणजे हीच का याची लायकी आहे. सुनील राऊत ह्याची उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लायकी कदाचित ओळखली. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राजाराम राऊतला साधं राज्यमंत्री पण बनवलं नाही.”
“जी खिचडी चोरी करण्याची क्षमता ही राजाराम राऊतांच्या कुटुंबीयांमध्ये आहे. यासाठी तुम्हाला खरंच मानलं पाहिजे. ही क्षमता अजून कोणाच्याही कुटुंबीयांमध्ये नाही. फडणवीसांनी काय करावं? कुठे काम करावं? एवढं बोलण्याएवढे आपण मोठे नाही आहोत. योग्य वेळी ते निर्णय घेतील. ह्या तिघांना काम करू द्या. उगाच बडबड करू नका आणि राऊतांना फुलटाॅस देऊ नका. संजय राऊत हा शकुनी मामा, सूर्याजी पिसाळ आहे.”
“बाळासाहेब तुझेही विठ्ठल होते ना मग त्यांचं घर का फोडले? संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भांडण लावून दिली. आता आदित्य आणि तेजस यांच्यात भांडणे का लावताय? पवारांसोबत देखील तेच केले. एकाबाजूला शरद पवार यांना विठ्ठल म्हणतोस ना मग सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात का भांडण लावतो? जिकडे जातो तिकडचे घर फोडतो. असली काड्या टाकण्याची कामे बंद कर आणि मग दूस-यांना सल्ले दे.” असा हल्लाबोल आ. नितेश राणेंनी राऊतांवर केला आहे.