संतोष बांगर, मी मुख्यमंत्री झालो… जितेंद्र आव्हाडांना आनंद; म्हणाले “तो माझ्या भावासारखा मित्र…”

Maharashtra Politics : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मी मुख्यमंत्री झालो तर पोलिसांना मी भगव्या टोप्या देईल, असं शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री झालो तर पोलिसांना भगव्या देऊ, असं म्हटल्याची आठवण संतोष बांगर यांनी करून दिली आहे. यावर आता माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
बांगर यांचं म्हणणं ऐकून मला अतिशय आनंद होतोय. माणसाने स्वप्न पहावीत ना. माणसाने महत्वकांक्षी असावं. महाराष्ट्राची आजची परिस्थिती बघता संतोष बांगर यांचं हे स्वप्न सत्यात उतरणं शक्य आहे. त्यामुळे संतोष बांगर स्वप्न बघत असेल तर वाईट काय? महाराष्ट्रातील बदललेल्या संस्कृतीत संतोष बांगर यांचं महत्त्वाचं स्थान आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

आमच्यातील एक वंजारी स्वप्न बघत आहे. त्या स्वप्न सत्यात उतरतंय की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र स्वप्न तर बघतोय. खांद्यावर बसून सिल्वेस्टर स्टेलोनसारखी बॉडी दाखवत आहे. असा मुख्यमंत्री मला आवडेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

संतोष बांगर माझ्या भावासारखा मित्र आहे. त्याच्या मनातील इच्छा काय आहेत. हे सर्वात जास्त मला माहित आहेत. त्याच्या सर्व काही गोष्टी मला माहित आहेत. अमेरिकनमधील सिल्वेस्टर स्टेलोन, माइक टायसन देखील सध्या घाबरलेला आहे. हा कोण मोठा आमच्यापेक्षा जास्त बायसेप शोल्डर असणारा कोण खेळाडू आहे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. गंजी फ्रॉकमध्ये लोकांमध्ये यायला हिंमत लागते. ती हिंमत संतोष बांगरमध्ये आहे, असंही ते म्हणालेत.