10वी आणि 12वीचा निकाल कधी लागणार? समोर आली मोठी अपडेट

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं १०वी आणि १२वीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झाल्या होत्या. यानंतर आता विद्यार्थ्यांसह पालक निकालाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बारावीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईल तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर दहावीला 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं.

दरम्यान परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाची प्रतीक्षा आहे. अशातच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बोर्डाकडून तयार झालं आहे. उत्तर पत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालं असून आता निकालाच तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.