12वी परीक्षेचा पहिलाच दिवस ; विद्यार्थिनीच्या कृत्याने आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली

चंद्रपूर । विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असणाऱ्या 12वी परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. परीक्षेचा पहिलाच दिवस असताना एक धक्कदायक घटना समोर आलीये. चंद्रपुरात बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.अनिशा खरतड (19) असे विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सदर घटना चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागात घडलीये.अनिशा खरतड ही आजोबांच्या मालकीच्या रिकाम्या फ्लॅटवर नियमितपणे अभ्यासासाठी जात होती. काल देखील ती येथे गेली मात्र बराचवेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईबाबांची काळजी वाढू लागली. अनिशा परत न आल्याने आईवडिलांनी फ्लॅटवर चक्कर मारली. त्यावेळी समोर दिसलेलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

अनिशाने पंख्याला गळफास घेतला होता. त्याच अवस्थेत तिला पाहून आई-वडिलांवर दुख्खाचा डोंगर कोसळला. आईच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या सर्व व्यक्ती तेथे धावून आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.पोलीस तपासात मयत विद्यार्थिनीच्या नोटबुकवर सॉरी असे लिहिलेले आढळले आहे.