---Advertisement---
जळगाव : देश आणि समाजासाठी तरुणांमध्ये वाढलेल्या आत्महत्येची प्रवृत्तीने चिंता वाढवली आहे. आत्महत्येमागे मानसिक आरोग्याची समस्या हे आत्महत्येचे एक प्रमुख कारण आहे. भारतातील सुमारे ५४ टक्के आत्महत्या मानसिक आरोग्य समस्यांमुळे दिसतात.चिंताजनकरीत्या सुमारे २३ टक्के आत्महत्या अभ्यासाच्या दबावामुळे म्हणजेच शैक्षणिक ताणतणावामुळे झाल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, भारतातील आत्महत्यांमध्ये सामाजिक आणि जीवनशैलीचे घटक सुमारे २० टक्के आणि हिंसाचाराचे घटक २२ टक्के योगदान देतात.
असाच प्रकार जळगाव शहरात घडला आहे, आई कामावर तर भाऊ शिकवणीसाठी गेले घराबाहेर गेले होते. ती घरी एकटी असतांना रामेश्वर कॉलनीतील १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याचे बाब समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव जयश्री लक्ष्मण चव्हाण (वय १५, रा. रामेश्वर कॉलनी) असे आहे. ही घटना मंगळवारी ( २ सप्टेंबर) रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनीत जयश्री चव्हाण ही आई व भाऊ यांच्यासोबत राहत होती. दि. २ सप्टेंबर रोजी तिची आई कामावर गेलेली होती तर लहान भाऊ शिकवणीला गेलेला होता. संध्याकाळी जयश्रीने शेजारील मुलींसोबत गणपतीसाठी दुर्वा तोडल्या नंतर पाय दुखत असल्याने स्वतःसाठी गोळ्या आणल्या. त्यानंतर तिने घरात गळफास घेतला.
तिचे आजोबा घराकडे गेले त्यावेळी ही मुलगी गळफास घेतल्याचे दिसले. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत. मुलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.