जळगावातील १८ हजार नळाना ‘अमृत’ चे पाणी

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील गिरणाटाकी परिसर खेळी, निमखेडी, तांबापूरा, सुप्रीम कॉलनी, जय नगर, जुने गाव, शिवाजी नगर पिंपाळा परिसरात अमृत योजनेचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अठरा हजार नळांना पाणी सुरू झाले आहे.

२५ टक्के भागात ‘अमृत’ योजनेव्दारे पाणी पुरवठा

शहरात एकूण ८० हजार नळकनेक्शन आहेत. त्यापैकी अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील १८ हजार नळाना ‘अमृत’ योजनेचे पाणी सुरू झाले आहे. अमृत योजनेतील साधरणतः २५ टक्के भागात आता ‘अमृत’ योजनेव्दारे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. नागरिकांच्या घराच्या कंपाऊंडपर्यंत अमृत योजनेतर्गंत मूळ जलवाहिनीतून घरगुती नळकनेक्शन जळगाव महानगर पालिकेने आणून दिले आहे.