राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणातील 24 शब्दांना कात्री

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी मणिपूरबाबत (Manipur Violence) लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारनं मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपावर हल्लाबोल केला. यावरून प्रचंड गदारोळ झाला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ केला. सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या या भाषणातील एकूण 24 शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत.

राहुल गांधीनी आपल्या भाषणात हत्या हा शब्द 15 वेळा वापरला होता. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी देखील हत्या हा शब्द वापरला होता तो संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे. हत्या शब्दाबरोबर कत्ल, देशद्रोही शब्द दोनदा, आणि मर्डर हत्यारा, हे शब्द एकदा वापरण्यात आला होता. हे सर्व शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत.

दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. संसद टीव्हीवर राहुल गांधी यांचं भाषण कापून दाखवल्याबद्दल व्यक्त करत नाराजी केली. तसेच संसद टीव्ही भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप अधीर रंजन यांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधींना पूर्णवेळ संसद टीव्हीने दाखवलं नसल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.