---Advertisement---
मुंबई : उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना निशाणा केल्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खडेबोल सुनावले आहेत. सत्ता गेली तरीही बेहत्तर पण विचारांशी तडजोड करणार नाही. राहुल गांधी आपला विचार मांडत आहेत. उद्धव ठाकरेही त्यांचे विचार मांडत आहेत. आमच्या किमान समान कार्यक्रमात सावरकर हा मुद्दा नव्हता. आम्ही सर्व धर्म समभाव या विषयावर एकत्र आलो होता. सत्ता येईल पण विचारांशी तडजोड करणार नाही, असेही नाना म्हणाले.