---Advertisement---

कंडारीत भावंडांची चाकू व तलवारीचे वार करीत हत्या : जिल्ह्यात खळबळ

---Advertisement---

भुसावळ : जुना वाद उफाळल्यानंतर झालेल्या तुफान हाणामारी दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू ओढवल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. हल्लेखोरांच्या हल्ल्यात शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या भावंडांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. हल्लेखोर खुनानंतर पसार झाले असून त्यांचा जिल्हाभरात कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

तलवारीसह चाकूचे वार करीत हत्या
कंडारी गावातील शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील काहींशी वाद असल्याने त्यातून शुक्रवारी दोघा भावंडांवर चाकूसह तलवारीने हल्ला करण्यात आला व त्यात दोघे जागीच ठार झाले तर हाणामारीत दोघे जखमी झाले. दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले असून हल्लेखोरांची माहिती काढण्याचे काम यंत्रणेने सुरू केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---