परीक्षेत नापास : १९ वर्षीय तरुणीने संपविलं आयुष्य

तरुण भारत लाईव्ह ।०२ मार्च २०२३। हिंगोली मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. बिए. प्रथम वर्षात नापास झाल्याने एका १९ वर्षीय तरुणीने आयुष्य संपविले असल्याची घटना समोर आली आहे. समीक्षा राजू नादरे असे मृत तरुणीचे नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथील १९ वर्षीय तरुणीने बीए मध्ये प्रथम वर्षात  नापास झाली म्हणून नैराश्यात तिने शेतातील फवारणीचे औषध प्राशन केले आणि त्यात तिचा मृत्यू झाला. समीक्षा राजू नादरे (वय १९), असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे.

दरम्यान कुटुंबातील व्यक्तींनी तिला उपचारासाठी नांदेड येथे नेले आणि काही दिवस उपचार घेतल्यावर दुर्देवाने आज तिची प्राणज्योत मालवली. या घटनेबाबत राजू तुकाराम नाचरे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. लेकीच्या जाण्यानं तिच्या कुटुंबावर आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.