---Advertisement---

मोर नदीजवळील वळण रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले; चार तासांत चार अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

---Advertisement---

आमोदा ता. यावल : येथील मोर नदीजवळील वळण रस्त्यावर होणाऱ्या अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. रविवारी (२९ जून) रोजी सकाळी ६.३० ते ९.३० वाजेदरम्यान तब्बल चार वाहनांचे अपघात झाले. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान,अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा फलक व गतिरोधक लावले होते, मात्र ते चुकीच्या जागी टाकल्याचे निदर्शनास आले आहे.

---Advertisement---

रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास इंदूरहून भुसावळकडे जाणारी प्रवासी बस (एम.पी. ४६ पी ९०९०) पावसात ब्रेक मारल्यानंतर चाक घसरल्याने थेट रस्त्याच्या काठावर जाऊन मातीत रुतली. यावेळी गाडी खड्ड्यात गेली असती तर मोठा अपघात झाला असता. बसमध्ये सुमारे २० प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

पिकअप पलटी, टँकर शेतात घुसला

दुसऱ्या अपघातात बोलेरो पिकअप (एम.एच.२८ बी.बी. ६८२५) फैजपूरहून येत असताना ब्रेक लागल्यानंतर गाडी रस्त्याखाली जाऊन पलटी झाली. चालक किरकोळ जखमी झाला. याचवेळी भारत पेट्रोलियमचा टँकर (एमएच ४१ जी ८५००) देखील ब्रेक लागूनही रस्त्यावरून सरकत थेट शेतात जाऊन थांबला. सुदैवाने या वेळी समोरून कोणतेही वाहन आले नव्हते, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

अपघात टाळण्यासाठी उपाययोजना गरजेच्या

वळणाच्या अगोदर तीन-चार योग्य ठिकाणी गतिरोधक टाकावेत, रस्त्यावर स्पष्ट पांढऱ्या रेडियम पट्ट्यांची रेखाटन करावे, सुरक्षेचे फलक योग्य उंचीवर व ठिकाणी लावावेत. मोर नदी परिसरातील वळणाचा रस्ता अपघातप्रवण बनत चालला आहे. प्रशासनाने त्वरीत योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणी प्रशासनाकडे स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---