लष्कराच्या वाहनांवर हल्ला, ४ जवान शहीद, पीएफएफने घेतली जबाबदारी

गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यामध्ये चार जवान शहीद झाले. अधिकार्‍यांनी सांगितले की, दोन शहीद जवानांचे मृतदेह विकृत झाले आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.