औरंगाबाद झालं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद ‘धाराशिव’

नवी दिल्ली : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिले आहे. याबद्दलचे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री  अमित शाह (Amit  यांचे आभार मानले आहेत.

फडणवीस यांनी काय म्हटलंय?
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सराकरने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री  अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असेही फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान, 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 4 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला. त्यानंतर 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.