---Advertisement---
जामनेर : भाजपकडून बुधवार (२५ जून) हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून देशभरात पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी, १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती, ज्या घटनेला २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त जामनेरात हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
---Advertisement---
आणीबाणीच्या काळात अनेक लोकशाहीविरोधी निर्णय घेण्यात आले. ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे इंदिरा गांधींनी केवळ लोकशाहीची विटंबनाच केली नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची अक्षरशः चिरफाड करून एका अर्थाने संविधानाची हत्याच केली, असे भाजपचे म्हणणे आहे.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आपली सत्ता वाचवण्यासाठी हा अलोकतांत्रिक निर्णय घेतला, जयप्रकाश नारायण याच्या नेतृत्वाखालील जनआंदोलनाने सरकारविरोधात आवाज उठवला होता, या जनआंदोलनाला चिरडण्यासाठी आणि विरोधकाचा आवाज दाबण्यासाठी आणीबाणीचा दुरुपयोग करण्यात आला आणीबाणी लावण्यात आली. या आणीबाणी काळात वृत्तपत्रे आणि माध्यमांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली. सरकारच्या विरोधात लिहिणाऱ्या किवा बोलणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली, लोकशाहीचा चौथा आधारस्तम असलेल्या माध्यमांची गळचेपी झाली.
नागरिकांचे जगण्याचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य, एकत्र येण्याचे स्वातंत्र्य यांसारख्या मूलभूत हक्क हिरावून घेण्यात आले, विरोधी पक्षांचे हजारो नेते आणि कार्यकर्ते, ज्यात आमचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जयप्रकाश नारायण यांचा समावेश होता, त्यांना कोणत्याही खटल्याशिवाय तुरुगात डाबण्यात आले. न्यायव्यवस्थेवर प्रचंड दबाव आणला गेला. अनेक न्यायमूर्तीना त्याच्या पदावरून हटवण्यात आले किया त्यांच्या बदली करण्यात आल्या. संविधानाने दिलेल्या मूल्याची सर्रास पायमल्ली करण्यात आली. लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न झाला.
आणि म्हणून भारतीय जनता पक्ष (आणि त्यावेळी जनसंघ) हा आणीबाणी विरोधातील लढ्यात आघाडीवर होता. आमच्या हजारों कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी तुरुगवास भोगला. आणीबाणीने आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवला आहे की, सत्ता कोणत्याही पक्षाकडे असो, लोकशाही मूल्याचे संरक्षण करणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे. आजही आपण पाहतो की, काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी लोकशाही संस्थांवर आणि संवैधानिक मूल्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. 25 जून हा दिवस केवळ स्मृतीदिन नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी सतत जागरूक राहण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.
आपण सर्वांनी मिळून हे सुनिश्चित केले पाहिजे की, भारताच्या भूमीवर पुन्हा कधीही आणीबाणीसारखा ‘काळा दिवस’ उजाडू नये, भाजप नेहमीच अशा प्रवृत्तींच्या विरोधात उभा राहून संविधानाचे आणि लोकशाही मूल्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. या अश्लाघ्य घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपने २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ अर्थात ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.