---Advertisement---

एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण, ठाकरे गटाचा मोठा निर्णय!

---Advertisement---

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला शिवसेना अधीकृत पक्ष व धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह देत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. यासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता हे चिन्ह मुख्यमंत्री गटाला मिळाले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. आता या धक्क्यानंतर उद्धव ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत म्हणाले की, जो पक्ष बाळासाहेबांनी, लाखो शिवसैनिकांनी बलिदान देऊन मोठा केला. तो पक्ष ४० बाजारबुणगे विकत घेतात. यावर काय बोलावं, लोकशाहीवरचा विश्वास आज गमावला आहे.

देशातील सगळ्या स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. न्यायव्यवस्था देखील गुलाम असल्यासारखं वागत आहेत. ४० बाजारबुणगे हे पैशांच्या जोरावर पक्ष विकत घेत असतील सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे, असं राऊत यांनी म्हटलं.

जे काही झाले ते सगळे दबाबातून झाले आहे. असे मला वाटते. निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही. जो निर्णय आला आहे तो विकत घेतलेला आहे. खोके सरकारने हे सगळे केले आहे. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. आम्ही पुन्हा कायद्याची लढाई लढणार आणि नवी शिवसेना उभारणार, असं राऊत म्हणाले.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment