Budget 2024 : 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर, जाणून घ्या कोणत्या योजनेचा झालाय फायदा ?

गेल्या 10 वर्षांत देशातील 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आल्याचे सांगितले होते. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या दोन योजनांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंतप्रधान स्वानिधी योजना आणि पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाखो लोकांना लाभ झाला आहे.