भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती!

तरुण भारत लाईव्ह । ठाणे : भिवंडीच्या वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. मौजे कैलासनगर (वळपाडा) येथे वर्धमान कंपाऊंड मध्ये ही दुर्घटना झाली आहे. सुमारे १.४५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना झाली आहे.

अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत कार्यास सुरुवात केली आहे. इमारतीचा ढिगारा उपसला जात असून त्याखालून लोकांना काढलं जात आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.