---Advertisement---

मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट, अखेर ‘या’ योजनेला मंजुरी

---Advertisement---

PM Dhan Dhanya Krishi Yojana : मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ‘पीएम धन धान्य कृषी योजने’ला मंजुरी देण्यात आली असून, या योजनेअंतर्गत दरवर्षी २४ हजार कोटी रुपयांच्या निधीतून १०० जिल्ह्यांमध्ये कृषी सुधारणा केल्या जाणार आहे.

काय आहे ‘पीएम धन धान्य कृषी योजने’ची वैशिष्ट्ये

१०० जिल्हे कृषी जिल्हा म्हणून विकसित करणे.

शेतीच्या प्रमाणात मागे असलेल्या १०० जिल्हे (प्रत्येक राज्यातील किमान एक जिल्हा) विकसित करणे.

११ मंत्रालयांच्या ३६ योजना एकात्मिक पद्धतीने राबवणे.

दरवर्षी २४००० कोटी रुपयांची तरतूद करणे.

सिंचन सुविधा विकसित करणे आणि कृषी उत्पादकता वाढवणे.

कापणीनंतर साठवणूक आणि क्रेडिटची उपलब्धता वाढवणे.

त्यासोबतच नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (सीपीएसई) लागू असलेल्या विद्यमान गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वांमधून एनएलसी इंडिया लिमिटेडला विशेष सूट देण्यातही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

अश्विनी वैष्णव म्हणाले यांनी सांगितले की या निर्णयामुळे एनएलसीआयएल त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी, एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडमध्ये ७,००० कोटी रुपये गुंतवू शकणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---