Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये टीम इंडियाच नव्हे अफगाणिस्तानही जाणार नाही ?

चॅम्पियन्स ट्रॉफीचे 2025 आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र, वृत्तानुसार, बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला आहे. अशातच अफगाणिस्तानचे सामनेही पाकिस्तानच्या बाहेर हलवण्याची मागणी होत आहे. वज्मा अय्युबी यांनी सोशल मीडियावर दावा केला आहे की, अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानमध्ये सुरक्षित नसल्याचं म्हटलं आहे.

प्रसिद्ध पश्तो कवी गिलमन वझीर यांची इस्लामाबादमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाल्यामुळे अफगाण संघाचा सामना पाकिस्तानच्या बाहेर हलवण्याची मागणी वझमा अयुबी यांनी केली आहे. ७ जुलै रोजी ते इस्लामाबादमध्ये एका सभेला संबोधित करत असताना संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले आणि त्यामुळे त्याचा गुरूवारी रुग्णालयात मृत्यू झाला. याच हत्याकांडाचा दाखला देत वज्मा अय्युबी यांनी लिहिले की, पाकिस्तानमध्ये कोणीही सुरक्षित नाही. त्याने आयसीसीला पत्र लिहून अफगाणिस्तानचे सामने इतरत्र आयोजित करावेत, अशी मागणी केली.

टीम इंडिया पाकिस्तानात जाणे अवघड
एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया आपल्या देशात येईल, असे स्वप्न पाहत आहे, तर दुसरीकडे बीसीसीआय रोहित आणि कंपनीला तिथे कधीही पाठवणार नाही हे स्पष्ट आहे. अनेक भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याचेही वृत्त आहे. मात्र, हा निर्णय बीसीसीआयच्या हातातही नाही. पाकिस्तानात जाण्यापूर्वी त्याला भारत सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आणि पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळणे जवळपास अशक्य आहे.