शैक्षणिक वर्षात नववी आणि अकरावीतही बदल

तरुण भारत लाईव्ह । ८ एप्रिल २०२३। दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेच्या मिळालेल्या गुणांमध्ये आता आधीच्या वर्षाचे गुण मिळणार आहेत. तसेच सीबीएसईसारख्या केंद्रीय मंडळाच्या परीक्षा पद्धतीत समन्वय साधून बारावीची परीक्षा दोन वेळा परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी राज्यात नवीन शिक्षण धोरणाच्या अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा हा सरकारने तयार केला आहे.

मसुद्यात अनेक प्रकारच्या नवीन शिफारशी करण्यात आल्या आहे त्यानुसार नवीन मूल्यांकन पद्धती विकसित केल्या जाणार आहेत तर पदवीच्या अभ्यासक्रमातही अमुलाग्र बदल केले जाणार असून नवीन पद्धतीत विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे मुभा मिळणार आहेत या नफा शिफारशी मध्ये देशभरात वर्ष 2023 24 च्या दहावी बारावीच्या परीक्षेपासून सीबीएससी मंडळाच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीत बदल केले जाणार आहेत याच्यामध्ये वर आधारित प्रश्न विचारण्यात येतील प्रश्नपत्रिकेतील लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे महत्त्वही कमी केले जाणार असून सुमारे 50 टक्के प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असणारा आहे.

दुसरीकडे राज्यातही बारावी परीक्षा मंडळाच्या परीक्षा या वर्णनात्मक व वैकल्पिक अशा दोन पद्धतीने होऊ शकतील सरकार त्यावर येता काळात निर्णय घेईल राज्यातील शिक्षण क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील जनतेकडून त्यावर सूचना मागण्यात येतील आणि मग त्यावर अंतिम निर्णय सरकार घेणार आहे राज्यात तब्बल 17 वर्षांनी राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा प्रस्तुत करण्यात आला आहे दहावी मध्ये एकूण प्रश्नांपैकी 50% प्रश्न हे बहुपर्यायी असतील एखाद्या घटनेवर किंवा इतर कोणत्याही समस्येवर आधारित प्रश्न विचारले जातील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग केवळ 20%च लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न यंदा 30% पर्यंत कमी केले दुसरीकडे बारावी मध्ये 40 टक्के व प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील एकात्मिक स्वरूपाचे व केस स्टडी वर आधारित प्रश्न विचारले जातील लघुत्तरी आणि दीर्घोत्तर डी प्रश्न प्रकारच्या प्रश्नांचे मागील वर्षाच्या 50% प्रमाण यंदा ४० टक्क्यांवर आणले आहे.

नववी आणि अकरावीतही बदल येत्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावी बरोबर सीबीएससी मंडळाने नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारात विचारण्यात येणार असून लघु आणि दीर्घ प्रश्न प्रकारच्या प्रश्नांचे महत्त्व कमी करण्यात येणार आहेत लघु आणि दीर्घ प्रश्न उत्तराच्या एकत्रित प्रश्नांना 50 ऐवजी चाळीस गुण असतील असे सीबीएससी मंडळाने म्हटले.