मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाणार शेतीच्या बांधावर

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राज्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस, गारपीट याचा फटका पीकांना बसला आहे. गारपीट आणि अवकाळीच्या नुकसानीवरून फडणवीस-शिंदे सरकार ऍक्शन मोडवर आले आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या नियोजन बैठका रद्द करुन थेट नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट नाशिकला रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अमरावती दौऱ्यावर निघाले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गारपीट आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेणार बांधावर जाऊन भेट घेणार आहेत. प्रशासन पोहोचेपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहे.