---Advertisement---
Life Style Parenting : अलीकडे लहान मुलांमध्ये मोबाइल, टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मुलांमधील चंचलता वाढू लागली असून, त्याचे वाईट परिणाम दिवसेंदिवस समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही काही उपाय घेऊन आलो आहोत, चला जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय.
पूर्वी लहान मुले नातेवाईकांचे क्रमांक गावी जाणाऱ्या बसचे नंबर व वेळ, वाढदिवस, अशा सर्वच गोष्टी पटकन लक्षात ठेवत होती. त्यातून वैचारिक पातळी व स्मरणशक्तीला वाव मिळत होता; पण आता सर्व मोबाइलमध्ये असल्याने विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती कमी होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुलांची कला, छंद जोपासा
पालकांनी मुलांना चित्रकला, हस्तकला, संगीत, नृत्य, वादन, इनडोअर व आउटडोअर गेम्स, हस्ताक्षर, वाचनाची गोडी लावावी. मुले त्यात रमतील आणि त्यातून त्यांची आवड-निवडही लक्षात येईल. तसेच मुलांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. जेणेकरुन त्यांचे मोबाईलकडे लक्ष जाणार नाही, असे प्रयत्न केले पाहिजे.
पालकांनो, हे उपाय नक्कीच करा
मोबाइल घेतल्यावर कोणाचाही व्यत्यय नको, म्हणून मुले एकांतात बसतात. ती इतरांमध्ये मिसळत नाहीत. तसेच मोबाइलच्या नादात इतर मुलांमध्ये न मिसळल्यामुळे त्यांची वैचारिक पातळी विकसित होत नाही. त्यामुळे त्याला मित्रांमध्ये खेळायला पाठवा. स्वतः त्याच्या बरोबर खेळा. रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी पालक त्यांना मोबाइल देतात. मोबाइल दिल्यावर मुले लगेचच शांत होतात. मोबाइलमुळे मुले चिडखोर होत आहेत. त्यामुळे त्याचा मोबाईलचा हट्ट पुरवू नका.