---Advertisement---

सावद्यातील नागरिक विविध समस्यांमुळे त्रस्त, मुख्याधिकाऱ्यांसोमर वाचला पाढा !

---Advertisement---

सावदा (प्रतिनिधी) : सावदा येथील शहरालगत असलेल्या पनापीर नगर, रजा नगर, गौसिया नगरसह विविध भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या तात्काळ सोडविण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक फिरोज खान, शिवसेना शहर प्रमुख सूरज (बद्री) परदेशी यांनी बुधवारी (२५ जून) रोजी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

शहरालगत असलेल्या काही भागात एन पावसाळ्यात रस्ते नाही. अमृत योजनेअंतर्गत काही ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. परिणामी मोठा चिखल झाला असून त्यातून जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चिखल खड्यामूळे नागरिक घसरून पडत असून, त्यांना किरकोळ जखमा होत आहेत. मुलांना शाळेत सोडण्यासाठी अक्षरशः खांद्यावर बसवून रस्ता पार करावा लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहे. शिवाय या भागात पथदिवे नसल्याने रात्री नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, अनेक ठिकाणी साप-विंचू निघत आहेत, त्यामुळे या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

मुख्याधिकाऱ्यांनी घेतली दखल

याची समस्यांची दखल घेत, मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी नागरिकांसमोर पथदिवे बसविणारे ठेकेदार यांना फोन करून कामाचे दिरंगाईबाबत विचारणा केली. पथदिवे त्वरीत बसविणे, नादुरुस्त पथदिवे बदलविणे याबाबत सूचना केल्या व काम त्वरीत न केल्यास आपले काम बंद करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. काही भागात खडी टाकण्याचे काम सुरू असून उर्वरित भागत लवकरच टाकू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---