विराटच्या जागी ‘हा’ खेळाडू उतरणार!

रांची : भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी-२० सामन्यांची पहिली मालिका आज २७ जानेवारीला रांची येथे होणार आहे. वनडे मालिकेनंतर T20 सीरीज जिंकण्याच टीम इंडियाच लक्ष्य आहे. बीसीसीआयने टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियांच्या एकदिवसीय सामने खेळणाऱ्या आठ खेळांडूची निवड केलेली नाही. तर पहिल्या सामन्यात बीसीसीआयने काही युवा खेळाडूंना संधी दिल्याची माहिती आहे.

यांची निवड नाही
रोहित शर्मा, विराट कोहली, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रीकर भरत, शाहबाज अहमद , रजत पाटीदार यांची निवड केली नाही.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. पंड्याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरोधात टी-२० मालिका २-१ च्या फरकाने जिंकली होती. आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर श्रीलंका ८ व्या स्थानावर आहे.

विराट कोहलीच्या जागेवर ‘हा’ खेळाडू उतरणार
 विराट कोहलीच्या जागी तीन नंबरवर राहुल त्रिपाठीला संधी मिळू शकते. तो स्फोटक फलंदाजीत माहीर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. तो कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाची वाट लावू शकतो. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने तुफानी बॅटिंग केली. 16 चेंडूत त्याने 35 धावा कुटल्या.