धरणगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर तात्काळ हटवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या वेळी भाजपचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन, उपसरपंच चंदन पाटील, राहुल पारेख, शिवसेनेचे धीरेंद्र पूरभे, संभाजी चव्हाण, रेखा पाटील, प्रथम सूर्यवंशी, श्रीपाद पांडे, आकृर्ष तिवारी, विशाल महाजन, गोपाल महाजन, पंकज पारधी, राकेश पाटील, समाधान माळी, पुरुषोत्तम धनगर, राजेश धनगर, मोहन शिंदे, हर्षल पाटील, मनोज माळी, मुन्ना मराठे, सागर पारधी, मनोज महाजन, गणेश महाजन, कपिल राजपूत, सागर चौधरी, चेतन वाघरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.