ट्विट करून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह फसले; आतापर्यंत तीन गुन्हे दाखल

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खोटे आरोप केले आहेत. एक दिवसापूर्वी दिग्विजय सिंह यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी लिहिले आहे की, “दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिमांसाठी राष्ट्रीय जल, जंगल आणि जमिनीच्या हक्काबाबत गोळवलकर गुरुजींचे काय मत होते, हे जाणून घेतले पाहिजे.”त्याखाली त्यांनी एका पुस्तकाचे एक पान टाकले आहे, ज्यावर लिहिले आहे की, “मी आयुष्यभर इंग्रजांचा गुलाम राहण्यास तयार आहे, पण मला असे स्वातंत्र्य नको आहे, जे दलित, मागासवर्गीयांना आणि मुस्लिम यांना समान अधिकार देईल. – गोळवलकर गुरुजी.”

त्यांच्या या ट्विटनंतर बराच गदारोळ झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिग्विजय यांचे ट्विट तथ्यहीन आणि सामाजिक द्वेष निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “संघाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हे खोटे फोटोशॉप चित्र टाकण्यात आले आहे. असे श्रीगुरुजींनी कधीच सांगितले नाही.

दिग्विजय सिंह यांच्या या कृत्यामुळे संघाच्या करोडो स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळेच दिग्विजय सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. हे तिन्ही प्रकरण मध्य प्रदेशात घडले आहेत. इंदूरमधील तुकागंज पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्याची नोंद राजगडच्या कोतवालीमध्ये तर तिसऱ्याची गुन्ह्यांची कॅंट पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दिग्विजय सिंह यांनीच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावरील अझीझ बर्नी यांचे ‘RSS की साजीश: 26.11’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. अजीज बर्नी यांनी मुंबई हल्ल्यासाठी संघाला जबाबदार धरल्याचे पुस्तकाच्या शीर्षकावरूनच स्पष्ट होते. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेला नसता तर लोकांनी बर्नीचे हे पुस्तक बरोबर मानले असते. देवाच्या कृपेने कसाब जिवंत पकडला गेला आणि त्याने पाकिस्तानच्या मदतीने मुंबईवर कसा हल्ला झाला हे सांगितले. दिग्विजय सिंहही अनेक दिवस फरार झाकीर नाईकच्या पाठीशी उभे होते. एवढेच नाही तर दिग्विजय सिंह झाकीर नाईक यांच्या मेळाव्यात जाऊन भाषणे करायचे.

राहुल गांधी यांचे राजकीय गुरू दिग्विजय सिंह असल्याचेही मानले जात आहे. दिग्विजय सिंह यांनीच राहुल गांधींना संघाविरोधात वक्तव्य करण्यास प्रवृत्त केले असा समज आहे. याचा दुष्परिणाम म्हणजे आज राहुल गांधी अनेक प्रकरणांना सामोरे जात आहेत.