---Advertisement---
जळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरु केले होते. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. परंतु, मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण हे ओबीसी समाजाच्या कोट्यातून देऊ नये अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीसाठी बुधवार (3 सप्टेंबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाने आंदोलन केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेण्यात आले. . याप्रसंगी ओबीसींच्या “जय ज्योती, जय क्रांती” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
ओबीसी समाजाने निवेदनाद्वारे सध्या ओबीसींना अल्प कोट्यातून 374 जातींना लाभ मिळतो. त्यात मराठ्यांना सामावल्यास ओबीसींचे आरक्षण नावापुरते उरेल. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण ते ओबीसी कोट्यातून देऊ नये. मराठा समाजाला हवे असल्यास त्यांनी ओबीसींच्या कोट्यात न शिरता न्यायालयीन लढाई लढावी. सरकारने सब-जीआर काढून अन्याय करू नये, या मागण्या केल्या आहेत.
जर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर तीव्र आंदोलन छेडले येईल असा इशारा समता परिषदेतर्फे देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे यांनी सांगितले की, आमचे आरक्षण हिसकावून घेतले जाणार असेल, तर आम्हाला आक्रमक व्हावेच लागेल. आम्ही न्यायालयीन लढाई लढतो, तसेच मराठा समाजानेही लढाई लढावी.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देतांना संतोष बळीराम माळी, डॉ. सुतिन देतेरे, दीपक पंडीत माळी, संतोष पाटील, राजेंद्र चौधरी, डॉ. एम. बी. सैनी, वसंत पाटील, किशोर सूर्यवंशी, विजय लोहार, विजय वानखेडे, अमोल कोल्हे, रवींद्र माळी, संतोष इंगळे, गोकुळ महाजन, अभिलाषा रोकडे आदींच्या उपस्थित होते.