---Advertisement---

अभिनव प्रयोग! विरावली गावात कृषिकन्यांनी केली चारा प्रक्रिया

---Advertisement---

जळगाव : बदलत्या हवामानात आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर शेती व पशुपालनात नवनवीन प्रयोग आवश्यक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील विरावली गावात आलेल्या कृषिकन्यांनी मिळून एक वेगळा प्रयोग केला. स्वतः प्रक्रिया केलेला चारा, या उपक्रमामुळे गावातील पशुपालकांना चाऱ्याचा पुरवठा सुटसुटीत व स्वस्त दरात मिळेल, असे त्यांनी सांगितले.

गावात सुरुवातीला फक्त काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया सुरू केली. त्यांनी मका, गहू, भुसा, हरित चारा आणि खनिज पूरक यांच्या योग्य प्रमाणात मिसळून चारा तयार करण्याचा प्रयोग केला. त्यासाठी त्यांनी घरातील वापरत येणाऱ्या छोट्या यंत्राचा वापर केला. या प्रक्रियेमुळे तयार होणारा चारा पोषणमूल्यांनी भरलेला, स्वच्छ व दीर्घकाल टिकणारा होतो.

या प्रयोगाचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात जसे की, पशुधनाचे दूध उत्पादन वाढले, जनावरांचे आरोग्य सुधारले, बाजारातून महागडा चारा विकत घेण्याची गरज कमी झाली, गावात स्वयंपूर्णतः आणि उद्योजकतेला चालना मिळाली. या कृषिकन्यांनी दाखवलेली कल्पकता ही गावातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ‘स्वावलंबी चारा निर्मिती’चा मार्ग दाखवत शेतीला आणि पशुपालनाला नवा मार्ग दिला चारा प्रक्रियाचे संयोजन कृषिकन्या धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावित, विशाखा सोनावणे, यांनी केले.

यावेळी शेतकरी पीतांबर निळे, कैलाश धनगर, आणि ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. कृषिकन्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.एम.पी भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---