अरेरे ! होणाऱ्या बायकोलाच आई म्हणण्याची आली वेळी, तरुणासोबत नेमकं काय घडलं ?

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये होणाऱ्या सासूसोबत जावई पळून गेल्याचा प्रकार नुकताच समोर आला. सासू-जावयाची ही प्रेमकहाणी सर्वत्र चर्चेत असताना, उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये सासऱ्याने होणाऱ्या सुनेला पळवून नेत तिच्यासोबत लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे होणाऱ्या बायकोलाच आई म्हणण्याची वेळ तरुणावर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये सासऱ्याने होणाऱ्या सुनेला पळवून नेत तिच्यासोबत लग्न केले. त्यानंतर दोघेही घरी परतले, यावेळी होणारा नवरा (मुलगा) आणि वडिल यांच्यात, तर नवविवाहित (सून) आणि तिच्या सासूमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद इतका वाढला की शेवटी गावातील लोकांना हे प्रकरण शांत करावे लागले.

शकील असे सुनेला पळवून नेणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे. मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याने स्पष्टपणे सांगितले होते की मी अल्पवयीन आहे आणि हे नाते माझ्यासाठी योग्य नाही. यानंतर, वडील माझ्यासमोर माझ्या भावी पत्नीशी बोलत राहिले आणि एके दिवशी ते आम्हाला सोडून दागिने आणि पैसे घेऊन पळून गेले.

शकीलच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मुलाने या नात्याला विरोध केला, तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. मुलाने सांगितले की, त्याने त्याचे वडील आणि त्याच्या भावी पत्नीमधील अनेक रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवले आहेत.

दरम्यान, सासऱ्यावर (शकील ) त्याच्या अल्पवयीन मुलाचे लग्न या तरुणीसोबत जबरदस्तीने निश्चित केल्याचा आणि नंतर त्याच तरूणीसोबत पळून जाऊन तिच्यासोबत लग्न केल्याचा आरोप आहे. मुलाचे लग्न निश्चित केल्यानंतर सासरे त्याच्या भावी सुनेशी तासंतास फोनवर बोलत असल्याचे सांगितले जात आहे,

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment