Girish Mahajan : राऊतांचे ते वक्तव्य आक्षेपार्य, काय म्हणाले होते संजय राऊत ?

जळगाव : महाविकास आघाडीच्या जळगाव व रावेर मतदारसंघाच्या  उमेदवारांचे २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रमुख म्हणून संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. त्यांचा जिल्हाधिकारी कार्यलासमोर समारोप झाला, त्यावेळी संजय राऊत यांनी महायुतीच्या उमेदवारांना (भाडखाऊंना) पाडा, असे आक्षेपार्य वक्तव्य केले होते. दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांचे वक्तव्य हे आक्षेपार्य असल्याचे म्हटले आहे.

महायुतीच्या जळगाव व रावेर मतदारसंघाच्या उमदेवारांचे आज २५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यलासमोर समारोप झाला, त्यावेळी  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांचे वक्तव्य हे आक्षेपार्य असल्याचे म्हटले आहे.