हार्दिक पांड्याने कांगारूला दिला तिसरा धक्का

sport : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. हार्दिक पांड्यानं सामन्यातील तिसरी विकेट मिचेल मार्शच्या रुपात बाद केलं आहे. मार्श 47 धावांवर बाद झाला आहे.