IND VS AUS FINAL : टीम इंडियाला तिसरा धक्का

तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

फायनल जिंकणे त्यांच्यासाठी सोपे नसेल कारण ऑस्ट्रेलिया पाच वेळा चॅम्पियन आहे. फायनल कशी जिंकायची हे या संघाला माहीत आहे. या संघाने जागतिक क्रिकेटवर राज्य केले आहे. पण यावेळी टीम इंडियाने या संघाला कोणत्याही किंमतीत हरवण्याचा निर्धार केला आहे.

टीम इंडियाला 2011 नंतर पहिल्यांदाच विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघाविरुद्ध हा पराक्रम करण्याची संधी आहे. यासोबतच 2003 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचीही ही उत्तम संधी आहे.