IND vs ENG : सामना आजच संपेल; इंग्लंडच्या पडल्या 9 विकेट

भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटीचा आज चौथा दिवस आहे. सध्या या सामन्यात टीम इंडिया फ्रंटफूटवर असल्याचे दिसत आहे. म्हणजेच या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी इंग्लंडला खूप प्रयत्न करावे लागतील. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ही तिसरी कसोटी असेल. येथील विजेत्या संघाला मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळेल. यापूर्वी हैदराबादमध्ये खेळली गेलेली पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली होती तर विशाखापट्टणममध्ये खेळली गेलेली दुसरी कसोटी भारताने जिंकली होती.