चार भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार ? पंतप्रधान मोदींनी केली नावांची घोषणा

केरळ : गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर स्बबळावर अवकाशात पाठवले जाणार आहेत. यामध्ये सहा टन वजानाची अवकाश कुपी अवकाशात पाठवली जाणार आहे. चार अतंराळवीरांना सामवण्याची क्षमता या कुपीची असेल. ही अवकाश कुपी पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर तीन दिवस प्रदक्षिणा घालेल असे गगनयान मोहिमेच्या पहिल्या मानवी मोहिमेचे नियोजन असणार आहे. इस्रोच्या या महत्वकांक्षी मोहिमेतील मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये इस्रोच्या तीन प्रमुख तांत्रिक विभागांचं उद्घाटन केले. यावेळी मोदींनी तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई आंतराळ केंद्राचा दौरा केला. यावेळी मोदींनी गगजनाय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या नावांचीही घोषणा केली. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजीत कृष्णन आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला हे गगनयान मोहिमेसाठी निवडलेले अंतराळवीर आहेत.

हे चारही भारतीय वायू दलाचे अधिकारी आहेत. बंगळूरु इथे अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी खास सुविधा तयार करण्यात आल्या आहे. एवढंच नाही तर रशियामध्येही या चार जणांनी काही काळ अंतराळवीरासाठी आणि अवकाश प्रवासासाठी आवश्यक ते प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात अमेरिकेची नासाही इस्रोला मदत करणार आहे. असं असलं तरी आत्तापर्यंत भारताने स्बळाबळावर भारतीय अंतराळवीर अकाशात पाठवला नव्हता. तेव्हा देशाचे हे चार अंतराळवीर २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगयनान मोहिमेतून अवकाश भ्रंमती करणार आहेत.

स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. बलाढ्य युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा यांनाही हे अजुनतरी शक्य झालेलं नाही. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही वेळही आपलीच आहे. आजची पिढी भाग्यवान आहे, असं विधान केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी व्हिएसएससीमधील ट्राइयोसोनिक विंड टनेल, तामिळनाडूतील महेंद्रगिरीमधील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समधील सेमी क्रायोजेनिक इंटीग्रेटेड इंजिनासंबंधी विभाग आणि सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रामधील पीएसएललव्ही एकीकरण विभागाचं उद्घाटन केलं.