ब्रेकिंग न्यूज ; ISIS च्या भारतातील प्रमुखाला अटक

आसाम : आगामी लोकसभा निवडणुकीत देशात अजारकता माजविण्यासाठी दहशतवादी सक्रिय झाले असल्याचा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. यामुळे अलर्टमोडवर असलेल्या सुरक्षा दलांनी ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक जण आयएसआयएसचा भारतातील प्रमुख असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीचे मोठे यश मानले जात आहे.

आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी गट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या दोन दहशतवाद्यांना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, धुबरी जिल्ह्याजवळील बांगलादेशातून ISIS दहशतवादी भारतात घुसले आणि राज्यात काहीतरी मोठे करण्याचा त्यांचा विचार होता. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये ISIS इंडियाचा प्रमुख हॅरिस फारुकी आणि त्याच्या एका सहाय्यकाचा समावेश आहे.

आसाम एसटीएफचे महानिरीक्षक IPS पार्थसारथी महंता यांनी सांगितले की, भारतातील ISIS चे दोन प्रमुख नेते शेजारच्या देशात तळ ठोकून असून ते लवकरच भारतात प्रवेश करणार असल्याची माहिती एका एजन्सींकडून मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी विशेष टीम तयार करून शोध मोहीम राबवली.

या मोहिमेत स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दोघांना धरमशाला परिसरातून पकडले आणि नंतर त्यांना गुवाहाटी येथील एसटीएफ कार्यालयात आणले. या दोघांची ओळख पटली असून आरोपी हॅरिस फारुकी उर्फ ​​हॅरिस अजमल फारुकी (रा. चक्रता, डेहराडून) हा भारतातील इसिसचा प्रमुख असल्याचे आढळून आले आहे. त्याचा साथीदार पानिपत निवावी अनुराग सिंग उर्फ ​​रेहान याने इस्लाम धर्म स्वीकारला असून त्याची पत्नी बांगलादेशी नागरिक आहे.

पोलिसांनी प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोघेही कट्टरपंथी आहेत. “त्यांनी भरती, दहशतवादी वित्तपुरवठा आणि भारतातील विविध ठिकाणी आयईडीद्वारे दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यात ISIS ची मगत केली आहे. या दोघांविरुद्ध एनआयए, दिल्ली, एटीएस आणि लखनऊ आणि इतर ठिकाणी अनेक खटले प्रलंबित आहेत. ते आसामची एसटीएफ या आरोपींना त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी एनआयएकडे सोपवेल.