जळगाव जिल्ह्यात होणार जमावबंदी, कधीपासून?

जळगाव : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश 9 ते 23 एप्रिल 2023 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही अपर जिल्हा दंडाधिकार्‍यांनी आदेशात म्हटले आहे.