Jalgaon News : फेसबुकवर मैत्री, अवघ्या काही दिवसांत लग्न केलं, प्रेयसी निघाली त्रुतीयपंथी

जळगाव : फेसबुकवर अनेकांची फसवणूक झाल्याचे आपण वाचले असलेच. अशीच एक घटना जळगावात समोर आली आहे. एका तृतीयपंथीने महिला असल्याचे सांगत तरुणाशी लग्न करून फसवणूक केली आहे. या प्रकरणी तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार तृतीयपंथीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील गिरणा पंपीगरोड परिसरात २६ वर्षीय तरूण वास्तव्यास आहे. या तरूणाची फेसबूकवरून एका तरूणीशी ओळख झाली. आई-वडिल अपघातात वारले असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर ओळखीनंतर अवघ्या काही दिवसात म्हणजेच २९ एप्रिल २०२३ रोजी तरूणीने त्या तरूणाशी लग्न केले.

काही दिवसात हळूहळू त्या तरूणीच्या हालचाली वेगळ्या वाटल्याने तरूणाला स्पर्श न करू देत असल्याने, तरूणाची शंका वाढत गेली. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसानंतर डॉक्टराकडे तपासणीला घेवून गेले असता तृतीयपंथीयाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिला असल्याचे बनाव करणाऱ्या तृतीयपंथीने तरूणाकडे १० लाखांची मागणी केली.हा प्रकार घडल्यानंतर तरूणाने जळगाव पोलीस अधीक्षक व रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

शिवाय जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात देखील याचिका दाखल केली. न्यायालयात या प्रकरणावर कामकाज होवून न्यायालयाने आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता दिले आहे. न्यायालयात तरूणाकडून ॲड.केदार भुसारी यांनी बाजू मांडली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तृतीयपंथीने एका ॲपवर व सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या नावाने अकांऊट उघडले असल्याचे लक्षात आले. यामध्ये अनामिका, सोनू, दिव्या, सोनल या नावांचा समावेश होता.