आजपासून खरमासला सुरुवात; जाणून घ्या कोणत्या राशींवर काय परिणाम होणार?

तरुण भारत लाईव्ह । १६ मार्च २०२३ । ज्योतिषशास्त्रानुसार एखाद कार्य शुभ वेळेत केल्यास ते तुम्हाला फलदायी ठरतं. अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शुभ वेळ फार महत्त्व आहे. जेव्हा सूर्य हा मीन किंवा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरु होतो. त्यामुळे सूर्याने मीन राशीत प्रवेश केला त्यामुळे आता पुढील एक महिना आपल्याला कुठलही शुभ कार्य करता येणार नाही.

सूर्य मीन राशीत 14 एप्रिलपर्यंत राहणार आहे. या काळात विवाह, घर किंवा मालमत्ता खरेदी करु नये. नवीन व्यवसाय, नवीन नोकरी इत्यादी गोष्टी करु नयेत. एकंदरीतच ज्योतिषशास्त्रानुसार कुठलंही शुभ कार्य या काळात करु नयेत. खरमासाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. कुठल्या राशीला काय काळजी घ्यायची आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

 

मेष – डोळ्याची काळजी घ्यावी.

वृषभ – अडकलेली कामं मार्गी लागतील आणि आर्थिक लाभ होईल.

मिथुन – आरोग्य सुधारेल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल.

कर्क – आरोग्याची आणि प्रवाश्यादरम्यान काळजी घ्या.

सिंह – कुटुंबात वाद आणि अपघात होण्याची शक्यता.

कन्या – वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या.

तूळ – समस्याचे निरासन होईल आणि धनलाभ होण्याची शक्यता.

वृश्चिक – आरोग्याची खूप काळजी घ्या.

धनु – आरोग्य आणि करिअरकडे लक्ष द्या.

मकर – अडकलेली काम पूर्ण होती. प्रत्येक कामात यश मिळेल.

कुंभ – डोळे आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन– नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता.