---Advertisement---

”आणखी किती सहन करू”, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने केली आयुष्याची अखेर, चाळीसगाव हळहळलं

---Advertisement---

जळगाव : राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. अशात पुन्हा जळगाव जिल्ह्यात एका २० वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली आहे. भारती सुनील बर्डे (२०) असे मयत महिलेचे नाव आहे.

---Advertisement---

चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारती सुनील बर्डे (वय २०, रा.आर्णी, ता. धुळे) या महिलेचा विवाह १८ जुलै २०२४ रोजी राजदेहरे येथील सुनील बबन बर्डे यांच्याशी झाला. लग्नाला काही दिवस उलटल्यानंतर सासू नीलाबाई व पती सुनील हे विवाहितेस काहीना काही किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करत होते.

ते बाहेरगावी ऊस तोडणीच्या कामासाठी, कंपनीच्या कामासाठी गेले, तेथेही विवाहितेस त्रास देत असे. यामुळे गावातील व नातेवाईक मंडळींनी पती व सासूस समजावण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र, ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने विवाहिता भारती हिने दि. २२ जून रोजी आपल्या राहत्या घरात (राजदेहरे) गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी भारती बर्डे हिचा भाऊ दीपक जयराम भिल याने दिलेल्या फिर्यादीवरून पती सुनील बर्डे व सासू नीला बर्डे यांच्याविरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---