खुशखबर ! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाला यश; आता ‘ही’ एक्सप्रेस भुसावळपर्यंत धावणार

जळगाव : रेल्वे विभागामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेली दादर – नंदुरबार (०९०४९/५०) एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार आहे. यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. विशेषतः रेल्वे प्रवाशाना मोठा दिलासा मिळणार आहे.

दादर – नंदुरबार (०९०४९/५०) एक्सप्रेस  नंदुरबारपर्यंत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती. ही गाडी भुसावळपर्यंत करण्यात यावी अशी मागणी जळगाव, धरणगांव,अमळनेर येथील रेल्वे प्रवासी संघटना, स्थानक सल्लागार समिती यांनी खा.स्मिता वाघ यांच्या कडे केली होती. ह्या मागणीच्या अनुषंगाने खा.स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

दरम्यान खानदेशला मुंबई सोबत जोडणाऱ्या यापूर्वी दोन रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या परंतु शुक्रवारी कुठलेही रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत होते. ही रेल्वे गाडी उपलब्ध होणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

ही गाडी आता भुसावळपर्यंत धावणार असल्यामुळे झेड.आर. यु.सी.सी.सदस्य प्रतीक जैन व प्रवासी संघटना यांनी खा.स्मिता वाघ यांचे आभार व्यक्त केले आहे.