---Advertisement---

National Youth Day 2025 : रविवारी राष्ट्रीय युवक दिन; जाणून घ्या काय आहेत यंदाची थीम

---Advertisement---

National Youth Day 2025 : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त, दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा नेमका उद्देश काय ? आणि यंदा युवा दिनाची थीम काय आहे ? यासंदर्भात आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त, दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश तरुणांमध्ये त्यांच्या विचारांची प्रेरणा जागवणे आणि देशाच्या विकासात तरुणांना सक्रिय योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

यावर्षी राष्ट्रीय युवा दिनाची थीम “राष्ट्र उभारणीसाठी युवा सशक्तीकरण” असून, ती तरुणांना राष्ट्रनिर्मितीसाठी अधिक जबाबदारीने आणि लवचिकतेने पुढे येण्यासाठी प्रेरित करते. देशभरातील शाळा, महाविद्यालये, तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये भाषण स्पर्धा, परिसंवाद, रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

स्वामी विवेकानंद : युवांसाठी प्रेरणास्त्रोत

स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकातामध्ये झाला. त्यांच्या विचारांमुळे भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली. १८९३ साली शिकागो येथे झालेल्या जागतिक धार्मिक परिषदेतील त्यांच्या प्रभावी भाषणाने भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विचारांचा डंका वाजवला.

त्यांचे विचार आजही तरुणाईसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी सांगितले होते की, “उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट प्राप्त होईपर्यंत थांबू नका.” या वचनांचा आधार घेत आजचा युवा नवीन भारत घडवण्याची जबाबदारी स्वीकारत आहे.

राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व

भारतीय सरकारने १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केले. त्यानंतर दरवर्षी हा दिवस तरुणांमध्ये स्वामीजींच्या विचारांची प्रेरणा पसरवण्यासाठी साजरा केला जातो.

युवकांसाठी संदेश

आजच्या दिवशी संपूर्ण तरुणाईसाठी स्वामी विवेकानंदांचे विचार हे एक दीपस्तंभ आहेत. त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीमुळे देशाचा तरुण वर्ग नवी स्वप्ने पाहतो, त्यासाठी मेहनत घेतो आणि भारताचे भविष्य घडवतो.

तरुणांनो, आजच्या दिवशी त्यांच्या विचारांचे चिंतन करा, तुमच्यातील शक्ती ओळखा आणि देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्या. “आपण सर्वजण संघटित होऊन कार्य केल्यास भारत जगात एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास येईल.”
– स्वामी विवेकानंद   

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment