Nitesh Rane : उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट?

उद्धव ठाकरे हा महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्यामध्ये सर्वांत अग्रक्रमांकावर आहे. ही दंगल पुण्यामध्ये भडकवण्यामध्ये त्यांचा कॉल रेकॉर्डिंग झाला. त्याबद्दलचे सगळे पुरावे हे पोलिस खात्याकडे होते. आणि मिलिंद नार्वेकर आणि निलम गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंचेच आदेश होते, की तुम्ही महाराष्ट्र दंगल घडवा. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात दंगली घडवण्यात अग्रेसर आहेत. अशी थेट टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना मीरा बोरवणकर यांनी एक सूचक विधान केले होते. त्यांच्या व्हिडीओचा दाखला देत राणेंनी उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधलाय.
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, “मीरा बोरवणकरांची एक पत्रकार परिषद दिल्लीला झाली. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक महत्वाचा खुलासा केला. जे कदाचित नजर चुकीमुळे पत्रकारांच्या समोर आले नसेल. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा दंगल घडली आहे, आपल्याला आठवत असेल तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेंची मागणी केली आहे. नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकरांच्या विरुद्ध पोलिस खात्याकडे सगळे पुरावे होते. आता आणि मिलिंद नार्वेकर म्हणजे कोण? मिलिंद नार्वेकर हे उद्धवजींचे आजपण खाजगी सचिव आहेत. आणि मिलिंद नार्वेकर आणि निलम गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंचेच आदेश होते. की तुम्ही महाराष्ट्रामध्ये दंगल घडवा.”
“राम मंदिर दिशेने जाणाऱ्या रामभक्तांच्या वेळेत देशामध्ये दंगली घडतील असं कोण बोलतंय? कोण आत्तापासून भाषण करतंय? तर उद्धव ठाकरे करतायत. मी तुम्हाला १३ ऑगस्ट २००४ ची पण घटना सांगितली. मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीसंदर्भात आता परत दुसरा पुरावा आलाय. पुरावासकट आलाय. इथे एक माजी पोलीस आयुक्त आपल्याला सांगत आहेत. मी या दोघांना चूक म्हणत नाही. पण ज्या उद्धव ठाकरेंनी यांना आदेश देत होते, ज्या उद्धव ठाकरेंचं हे काम करतात. त्या उद्धव ठाकरेंचे हे खाजगी सचिव आहेत.त्या उद्धव ठाकरेची चौकशी झाली पाहिजे.” अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.